Posts

Showing posts from April, 2017

गुरफटलेला समाज...!.

समाजा समाजा असा कसा रे समाजा ,,, असाच गुरफटुन राहशील तर, जाईल समशानात तुझा जनाजा!!! समाज काय म्हणेल, या भीतीने लोक खूप दाबून राहतात,,,, हवं ते करता येत नाही, पण ते दुसऱ्या कुणी तरी केलं याच चित्र पाहतात!!!! समाजा समाजा तू ना घोड्यावर बसून देतो ना पाइ चालू देतो,,, मधातच लटकून लटकून मात्र सगळ्यांचा जीव जातो!!!! जाती पाती कडे लक्ष देऊन तू खूप धिंगाणा घातलास,,, सर्व धर्म समभाव ही पद्धत कसा रे तू विसरलास?!!!! पोटासाठी भीक माघणारे इथे खूप जण दिसतात,,,, का रे ? तुला कधी दिसत नाहीत का कधी जे भीक मागतात!!!! असच करत राहिलास, वागत राहिलास तर कस चालेल हे जग,,?? हर एक इंसान तडपुन तडपुन मरून जाईल, मग फेड आपल्या कर्मांचे भोग!!!! समाजा समाजा असा कसा रे समाजा ?.. जरा सुधरला समाजा,,, तर होईल सगळ्या जगात आनंदाचा गाजा-बाजा!!!!!                      -- ग. सु. डोंगरे                     (८६०५५२२२८५)

कुणास ठाऊक...?

का कुणास ठाऊक....? मन हे उदास होते,, सगळं गजबजलेलं असून देखील स्वतः ला एकटे फील करते.....! का कुणास ठाऊक......? जीव कासावीस होतो,,, झालेल्या भूतकाळाचा मकरंद पुन्हा चाखायला लागतो.....! का कुणास ठाऊक....? विचारांच्या दुनियेत देह रमून जातं,, जुन्या आठवनिंचा त्रास होत असला तरी तो एकदम मज्जा घेऊन पाहतं....! का कुणास ठाऊक......? कधी का विचार येत नाही  तुला विसरायचा,,,? मनातलं दुःख सहन करत तुझ्या हसण्यातल सुख बघायचा.....! का कुणास ठाऊक ......? हे नेत्र कधी कायमचे मिटतील,,,? घडलेल्या या गोष्टींचा शेवट करून श्वास हि बंद होईल.......!                         --- ग. सु. डोंगरे

बरेच दिवस झाले

बरेच दिवस झाले बरेच दिवस झाले , कविता लिहिली नाही म्हंटल लिहावी, पण शब्दांचे कोडे काही सुटले नाही..! बरेच दिवस झाले , कुठे मनसोक्त फिरलो नाही म्हंटल फिरावं, पण बसलेले पाय काही जागचे उठले नाही...! बरेच दिवस झाले , काही नवीन केलं नाही म्हंटल करावं, पण मन पार गंजून गेलं त्यात काही उर्मी आलीच नाही...! बरेच दिवस झाले , कुणाची मदत केली नाही, म्हंटल करावी, पण स्वार्थी हा हात, मदती साठी कधी धावतच नाही...! बरेच दिवस झाले , मोडलेलं प्रेम जोडायचा प्रयत्न केला नाही म्हंटल जोडावं, पण हृदयाचे तुकडेच इतके बारीक होते की परत जोडताच आले नाही...! बरेच दिवस झाले , जीवन हे असच चालू आहे म्हंटल त्याला थोडं सजवावं, पण सजवायला दागिने कुठं उरलेच नाहीं...! बरेच दिवस झाले , कविता लिहिली नाही, म्हंटल लिहावी, पण शब्दांचे कोडे काही सुटलेच नाही...!         कविता काही लिहिलीच नाही.....!                         --  ग. सु. डोंगरे