आई चे अश्रु....!
(मुंबई मधे एक वर्ष काम करून परत घरी जाऊन मुंबई ला परत येण्याचा योग) मुंबई सोडल्यानंतर जवळपास नऊ महीने घरिच होतो, त्यात नेट चा अभ्यास तर एम फिल च्या प्रवेश परिक्षाची तयारी, तीन ठिकाणी परीक्षा देऊन ही प्रवेश मिळाला नाही, काही ठिकाणी मी कमी पडलो, काही ठिकाणी पैसा कमी पडला तर काही ठिकाणी मी ओपन कैटेगरी चा आहे म्हणून नंबर नाही लागला. पण तीन वर्षानंतर घरी आलो होतो, म्हणून जरा बरं वाटत होतं. नेट परीक्षा झाली, त्यात पास नाही झालो मग कुठून तरी अशी जाणीव होऊ लागली की घरी राहून अभ्यास नाही होत, कुठेतरी बाहेर रूम करून राहून अभ्यास करू, त्याच बरोबर पैसे कमवायच्या वयात घरी बिनाकामाचे बसून राहणे मला ही जडच जात होते, अभ्यास करतो म्हणावे तर त्या मानाने अभ्यास ही नव्हता होत. मग शेवटी बाहेर राहून काहीतरी नोकरी करुन अभ्यासही करावा असा विचार केला आणि मुंबई ला परत जायचे ठरवले! पण एकीकडे मनात असे ही विचार होते की मुंबई सोडून खुप काही गावासाठी, आई वडिलांसाठी आणि मानसिक अजारांसाठी स्वप्ने घेऊन आलो पण त्यातले एकही पूर्ण झाले नाही किंवा होऊ शकले नाही. म्हणून मुंबई पेक्षा दुसरीकडे कुठे